Section A
Q1. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 600 शब्दांत निबंध लिहा : 100 सर्जनशीलतेचे पोषण करणाऱ्या शिक्षणाची गरज
(a) भारतातील वन्यजीवांच्या संरक्षणाची आव्हाने
(b) किशोरांच्या मानसिकतेवर चित्रपटांचा परिणाम
(c) दिव्यांगांचे सक्षमीकरण
(d) 2. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि उताऱ्याच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सुस्पष्ट, योग्य व संक्षिप्त भाषेत लिहा : 12× 5 = 60 काही हजार वर्षापर्यंत मनुष्य पृथ्वीवर शिकारी म्हणून होता. नव-पाषाण युगापर्यंत तो शेतीसाठी स्थायिक झाला नव्हता. दूरस्थ भागात न जाता तो शेतीची मशागत करून अन्नाचे उत्पादन वाढविण्यास तो सक्षम झाला आणि सातत्याने शेतीचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहिला. आजपावेतो तो पूर्वीच्या तुलनेत अधिक आणि उत्तम शेतीचे उत्पादन घेण्यास समर्थ राहिला आहे. परंतु जोपर्यंत सागराचा संबंध आहे तो-पर्यंत तो जवळजवळ शिकारीच आहे. तो मासे आणि इतर जलचरांना पकडतो परंतु त्यांची सतत वाढ आणि पूर्तता कायम ठेवण्यासाठी मर्यादितच प्रयत्न करीत आहे. आजपर्यंत जलचरांच्या शिकारीमुळे त्याला सर्वाधिक पोषक प्रोटीनची प्राप्ती झाली आहे. जमीन शेतीपासून मिळणाऱ्या प्रोटीनच्या पूर्ततेचा तो पुरक आहे. परंतु विश्वातील वाढत्या लोकसंख्येमुळे मनुष्याला लवकरच सागरापासून मिळणाऱ्या इतक्या मोठ्या प्रोटीनची आवश्यकता होऊ शकते की त्याची ही मुबलक आणि सतत होणारी पूर्तता देखील संकटात सापडेल. त्यासाठी मनुष्याला सागरी शेतीच्या माध्यमातून पुरेसा पुरवठा कायम ठेवण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली पाहिजे. कमी प्रमाणात मासे पालन तलाव आणि सरोवरांमध्ये पूर्वीच यशस्वीरित्या केल्या गेले. विशेषतः जलविद्युत प्रकल्पाकरिता बांधांच्या निर्मितीसाठी निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात हे कार्य केल्या गेले. गोड्या पाण्याच्या तलावात माश्यांच्या उत्पन्नाने प्रोटीनच्या पूर्ततेत आधीपेक्षा बरीच वाढ झाली आहे. त्यातील काहींचा विकास ग्रामीण समुदायात कृषीअधिकाऱ्यांच्या मदतीने आणि पर्यवेक्षणाद्वारे होत आहे. एकदा मासे तलावांना परिपक माश्यांनी समृद्ध केले तर माश्यांचा निरोगी वातावरणात विकास होतो आणि त्यांच्या भोजनाची देखील पुरेशी सोय होते. पाण्यात मोठ्या संख्येने पोहणारे प्लॅंकटन, सूक्ष्मजीव आणि वनस्पती जलचर प्राण्यांसाठी मुख्य खाद्य आहे. लहान मासे त्यांना खातात व आपल्यापेक्षा मोठ्या माशांचे भोजन बनतात. प्लॅंकटन हे पाण्यातील उपस्थित खनिजांमुळे वाढतात, प्लॅंकटनची संख्या खतांच्या द्वारे वाढविल्या जाऊ शकते. सागरी शेती जरी व्यावहारिक आणि फायदेशीर होऊ शकली तरी त्यातील काही समस्या प्रथम सोडवाव्या लागतील. उदाहरणार्थ सागरातील त्याभागात खते टाकणे उपयोगी नाही, जेथे सागराच्या लाटा वेगाने खतांना मैलो दूर अनुत्पादक SDF-C-MRTH/34 \overline2