Section A
Q1. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 600 शब्दांत निबंध लिहा: 100 मुलांच्या कुपोषणाची समस्या
(a) वैश्विक शांततेची आव्हाने
(b) \sim मातृभाषा आणि प्राथमिक शिक्षण
(c) भाडोत्री मातृत्वाचा सामाजिक स्विकार
(d) 2. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि उताऱ्याच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सुस्पष्ट, योग्य व संक्षिप्त भाषेत लिहा : 12× 5 = 60 प्राचीन भारतामध्ये राजेशाहीचा एवढा प्रभाव होता की राजाला राज्याचा आत्मा म्हटले जात असे. प्राचीन धार्मिक ग्रंथांच्या नुसार राजा हा प्रजेसाठी ईश्वराचा प्रतिनिधी आहे असे समजले जात असे. त्यामुळे प्रजा राजाच्या सहकार्याने आपल्या दुःखी जीवनापासून मुक्तता मिळवू शकत असे. राजा नसलेल्या समाजाचा जीवनव्यवहार त्रासदायक होत असे. प्राचीन भारतातील विद्वानांनी ‘राजा आणि राज्य’ यांच्या उत्पत्तीसंदर्भात वेळोवेळी अनेक विचार मांडले आहेत. त्यांना वेगवेगळ्या सिद्धान्तांच्या पार्श्वभूमीवर सादर केले आहे. उदाहरणार्थ, दैवी सिद्धान्त, शक्ती सिद्धान्त, संरक्षण सिद्धान्त व सामाजिक सलोखा सिद्धान्त इत्यादी. कौटिल्याने राज्याला मानवी जीवनासाठी महत्त्वपूर्ण, आवश्यक व कल्याणकारी संस्था मानले आहे. त्याने राजाच्या उत्पत्तीसंदर्भात क्रमबद्ध मांडणी केलेली नाही, परंतु त्याच्या अर्थशास्त्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जसे लहान माशाला मोठा मासा गिळकृत करतो, त्या प्रमाणेच प्राचीन कालखंडामध्ये सबळ लोक निर्दलांना त्रास देत असत. हा मन्याय (मत्स्य-न्याय) म्हणजेच 'जंगली राज'ने प्रजा त्रासली जात असे. त्रासलेल्या प्रजेने एकत्र येऊन एका सक्षम व्यक्तीला आपला राजा बनवले. त्यांनी राजाला शेतीच्या उत्पन्नातील सहावा भाग आणि व्यापाराच्या उत्पन्नातील दहावा भाग देण्याचे निश्चित केले. त्या बदल्यात राजाने प्रजेच्या कल्याणाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. जे लोक राजाद्वारे केलेल्या व्यवस्थेला मानत नव्हते, त्यांना शिक्षा केली जात असे. राजाला इंद्र आणि यम यांच्याप्रमाणे प्रजेचा रक्षक आणि कृपा करणारा मानले गेले आहे. कौटिल्याच्या मतानुसार राजाच्या आज्ञेचे पालन न करणे किंवा त्याचा अपमान करणे निषिद्ध मानले जात असे. ज्या समाजामध्ये राजाच्या माध्यमातून प्रजेचे रक्षण केले जाते त्या ठिकाणचे लोक घराचे दरवाजे उघडे ठेऊन वावरतात. जेव्हा राजा रक्षण करतो तेव्हा महिला एकटी देखील सालंकृत होऊन रस्त्याने विहार करते. राजाने संरक्षित केलेल्या समाजात ‘मानवतेचे साम्राज्य’ असते. अशा राज्यामध्ये सर्व प्रकारची गती-प्रगती असते. इतर प्राचीन ग्रंथांसोबतच कौटिल्याच्या HXS-C-MRTH/27 2